E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
देशातील भीषण विमान अपघात
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
१२ नोव्हेंबर १९९६ : हरयानात ३४९ जणांचा बळी
भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात १२ नोव्हेंबर १९९६ रोजी झाला. तो चरखी दादरी विमान अपघात म्हणून ओळखला जातो. हरयानातील चरखी दादरीजवळ दोन विमाने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. एक विमान सौदी एअरलाइन्सचे ७६३ आणि दुसरे कझाकस्तान एअरलाइन्सचे १९०७ होते. या विमानांच्या धडकेत दोन्ही विमानांमधील सर्व ३४९ जणांचा मृत्यू झाला होता. वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण यांच्यातील गैरसमज आणि उंचीची माहिती योग्यरित्या समजू न शकल्यामुळे हा अपघात झाला.
१ जानेवारी १९७८ : अरबी समुद्रात २१३ जणांना जलसमाधी
१ जानेवारी १९७८ रोजी मुंबईहून उड्डाण केल्यानंतर एक बोईंग ७४७ विमान अरबी समुद्रात कोसळले. दिशात्मक गोंधळ आणि तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या अपघातात २१३ जणांना आपला जीव गमवावा लागला. विमान मुंबईहून दुबईला जात होते.
२२ मे २०१० : कर्नाटकात विमान कोसळले; १५८ प्रवाशांचा मृत्यू
२२ मे २०१० रोजी एअर इंडिया एक्सप्रेस ८१२ हे विमान दुबईहून कर्नाटकला जात होते. विमानात १६६ लोक होते. लँडिंगच्या वेळी खराब हवामान आणि धावपट्टी उखडल्याने हा अपघात झाला. विमान धावपट्टीवरून घसरून एका खोल खड्डयात पडले. विमानाचे दोन भाग झाले. या अपघातात १५८ जणांचा मृत्यू झाला. तर आठ प्रवाशांचा जीव वाचला.
१९ ऑक्टोबर १९८८ : अहमदाबादमध्ये १३० जणांचा मृत्यू
१९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअरलाइन्सचे ११३ हे विमान मुंबईहून अहमदाबादला जात होते. अहमदाबाद विमानतळावर उतरताना ते कोसळले. विमानात असलेल्या १३५ जणांपैकी १३० जणांचा या अपघातात मृत्यू झाला. भारताच्या इतिहासातील चौथा सर्वात प्राणघातक विमान अपघात मानला जातो.
१७ जुलै २००० : पाटणा येथील दुर्घटनेत ५६ ठार
१७ जुलै २००० रोजी अलायन्स एअरचे बोईंग ७३७-२ ए ८ विमान बिहारची राजधानी पाटणा येथे अपघातग्रस्त झाले. या अपघातात ५६ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापैकी ५१ मृतदेह विमानात आणि ५ मृतदेह जमिनीवर आढळले. लँडिंग दरम्यान विमान एका सरकारी निवासी वसाहतीवर कोसळले.
२६ एप्रिल १९९३ : औरंगाबादमध्ये विमानाची मोटारीला धडक; ५५ ठार
२६ एप्रिल १९९३ रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान ४९१ औरंगाबादहून मुंबईला जात होते. विमानाने उड्डाण घेतले तेव्हा धावपट्टीवर एक मालमोटार होती. वैमानिकाला मालमोटार न दिसल्याने विमान त्याच्यावर आदळले. त्यानंतर विमानाला आग लागली आणि त्याचे तुकडे झाले. या अपघातात ५५ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले.
७ ऑगस्ट २०२० : केरळमध्ये २१ जणांचा मृत्यू
७ ऑगस्ट २०२० रोजी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून १०० फूट दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानाला अपघात झाला. यामध्ये २१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ११० जण जखमी झाले.
१२ जुलै १९४९ : घाटकोपरजवळ ४५ ठार
१२ जुलै १९४९ रोजी केएलएम लॉकहीड कॉन्स्टेलेशन हे विमान मुंबईतील घाटकोपरजवळ कोसळले. खराब हवामानात विमान उतरवण्याचा प्रयत्न करताना वैमानिकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली. यात १० क्रू मेंबर्स आणि ३५ प्रवासी अशा ४५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार एच.आर. द निकरबॉकर यांचे निधन झाले होते.
१४ जून १९७२ : पालम विमानतळाजवळ ८५ जणांचा बळी
१४ जून १९७२ रोजी जपान एअरलाइन्सचे ४७१ हे विमान पालम विमानतळाजवळ कोसळले. नेव्हिगेशनमधील त्रृटींमुळे ही दृर्घटना घडली. यात ८२ प्रवाशांसह अन्य तिघांचा मृत्यू झाला.
३१ मे १९७३ : पालम विमानतळावर ४८ जणांचा मृत्यू
३१ मे १९७३ रोजी इंडियन एअरलाइन्सचे ४४० हे विमान पालम विमानतळावर
उतरताना वैमानिकाच्या चुकीमुळे कोसळले. यातील ६५ पैकी ४८ प्रवाशांचा मृत्यू झाला.
१२ ऑक्टोबर १९७६ : मुंबईत ९५ नागरिकांचा मृत्यू
१२ ऑक्टोबर १९७६ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या १७१ या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. हे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्याच्या प्रयत्नात कोसळले. यावेळी विमानाला लागलेल्या आगीत ९५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
१४ फेब्रुवारी १९९० : बंगळुरूत ९२ ठार
१४ फेब्रुवारी १९९० रोजी इंडियन एअरलाइन्सचे ६०५ हे विमान बंगळुरूमधील एचएएल विमानतळाजवळ कोसळले. या घटनेत विमानातील १४६ पैकी ९२ जणांचा मृत्यू झाला. वैमानिकाची चूक आणि डिजिटल कॉकपिटबद्दलचे अज्ञान यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
१६ ऑगस्ट १९९१ : इम्फाळजवळ ६९ जणांचा मृत्यू
१६ ऑगस्ट १९९१ रोजी बोईंग ७३७ - २ ए ८ नोंदणीकृत व्हीटी-ईएफएल विमान उतरताना इम्फाळजवळच्या थांगजिंग हिलच्या डोंगराळ भागात कोसळले. या दुर्घटनेत ६३ प्रवासी आणि ६ क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. इम्फाळला जाण्यासाठी वैमानिकाने लेखी प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे हा अपघात झाला. विमानचालकांनी शॉर्टकट घेऊन विमानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन करण्याचा निर्णय घेतला होता.
Related
Articles
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !